• Post author:

 चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेखातून…….

चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेखातून.......

या भारताच्या इतिहासात सम्राट अशोक हा या देशाला अज्ञात राहिला. या देशात जर सम्राट अशोक यांनी शिलालेख  लिहिले गेले नसते तर कदाचित एक महान व्यक्तिमत्व आपण समजू शकलो नसलो. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या  हयातीत लिहिले गेलेले शिलालेख हेच सम्राट अशोक यांच्या इतिहासाचे प्रमुख स्त्रोत आहेत. 
चक्रवर्ती सम्राट हे विश्वातील पहिले सम्राट आहेत ज्यांनी प्राणीहत्या कायदा केला आहे. आपल्या राज्यात कोणत्याची प्राण्याची हत्या करणे हे दंडनीय अपराध आहे. प्राचीन काळात यज्ञामध्ये प्राण्यांची हत्या केली जात असे. बुद्धाने हि यज्ञामध्ये प्राणीहत्या करू नये म्हणून विरोध दर्शवला होता आणि यज्ञ कसे केले पाहिजे याचे ज्ञान लोकांना दिले होते. सर्वसामान्य लोकांमध्ये यज्ञ याग मध्ये पशुहत्या  करण्याची परंपरा पाहायला मिळते. केवळ दुसऱ्यांना प्राणी बंदी करून चालणार नव्हते तर आधी सुरुवात स्वतःपासून झाली पाहोजे म्हणून सम्राट अशोक यांनी प्रथम आपल्यापासून सुरुवात  केली. स्वतःच्या पाकशाळेत मारले जाणारे प्राणी आणि पशु प्रथम बंद केले. सम्राट अशोक यांच्या पाकशाळेत मोठ्या संख्येने प्राणी पशु यांची हत्या होत होती. भोजनासाठी मोठ्या संख्येने पशु प्राणी मारले जात होते. यावर प्रथम बंदी  घातली. जनतेला हि सांगितले कि हे दोषयुक्त काम आहे. कोणी हि कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये म्हणून दंडक घातला. आता याचा अर्थ असा नाही कि प्राणी हत्या करू नये यामध्ये गरज आणि इच्छा या दोन गोष्टींची सांगड घालून हा आदेश दिलेला होता. त्यामुळेच सर्व जनतेचे सम्राट अशोक यांचा हा आदेश स्वीकारला. जनतेने सम्राट अशोक यांच्या प्रत्येक आदेशाचे  अनुसरण केले. त्यामुळे प्राचीन काळात प्राण्यांना अभय मिळाले. प्राण्यासाठी अभयारण्य निर्माण झाली. त्यामुळे जंगलांची संख्या वाढली मोठी मोठी जंगले निर्माण झाली. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले. शेतीसाठी पुरक वातावरण निर्माण झाले जमिनीची झांडाच्या लागवडीमुळे धूप थांबली. त्यामुळे सम्राट अशोक यांच्या राज्यात  धरती सुजलाम सुफलाम असलेली पाहायला  मिळाली. 
आदेश कश्या पद्धतीने द्यायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट अशोक आहेत. सर्वात महत्वाचे तत्व आहे हे , जोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होत नाही आणि आपण इतरांना सांगत सुटलो तर त्या देशाचे पालन होत नाही. सम्राट अशोक यांनी आधी स्वतःमध्ये सुधारणा केली आणि मग जनतेत सुधारणा केली. म्हणून स्वतःपासून सुरुवात करा नक्कीच बदल होतो. 

सम्राट अशोक यांचा प्राणी हत्या बंदी कायदा अभ्यासण्यासाठी खालील शिलालेख पहा

गिरनार शिलालेख भाग १

इयं धमलिपि देवानं प्रियेन
प्रियदसिना राञा लेखापिता इध न किं
चि जीवं आरभित्पा प्रजूहितव्य
न च समाजो कतव्यो बहुकं हि दोसं
समाजम्हि पसति देवानं प्रियो प्रियदसि राजा
अस्ति पि तू एकचा समाजा साधू मता देवानं
प्रियेस प्रियदसीनो राञो पुरा महानसम्हि
देवानं प्रियेस प्रियदसीनो राञो अनुदिवसं ब
हुनि पान सत सहसानि आरभिसु सुपाथाय
से अज यदा अयं धमलिपी लिखिता ती एव पा
णा आरभरे सुपाथाय द्वो मोरा एको मगो सो पि
मगो ण धुवो एते पिती पाणा पछा न आरभिसरे
भाषांतर : हि धम्मलिपी देवान प्रियेन प्रियदर्शी राजा याच्या द्वारे लिहिली आहे . कोणी हि येथे यज्ञ यागासाठी प्राण्यांची हत्या बळी देण्यासाठी देवू नये आणि असे समाजउत्सव देखील करू नये उत्सवामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत हे देवानपियेन पियादर्शी राजा याने पाहिलेले आहेत. तरी देखील निश्चित उत्सवाचे प्रकार च देवानपियादर्शी राजा ते योग्य मानतो.
पूर्वी देवानपियेन पियदर्शी राजाच्या भोजनालय मध्ये हजारो प्राणी सूप बनवण्यासाठी मारले जात होते. परन्तु आतापासून जेव्हापासून हि धम्मलिपी मधून हा आदेश कोरलेला आहे तेव्हापासून तीन च प्राणी मारले जात आहेत. दोन मोर आणि एक हरीण सूप बनवण्यासाठी मारले जात आहेत परंतू यामध्ये हरीण मारणे निश्चित नाही पुढे जावून काही दिवसात हे तिन्ही प्राणी मारले जाणार नाहीत
वरील शिलालेखांचे वाचन केल्यावर लक्षात येईल कि, सम्राट अशोक हे किती महान असे व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला लक्षात येईल. जेव्हा एखाद्या साम्राज्यात पशु हत्या वाढीस लागते   त्यावेळी साहजिक च निसर्गाच्या अन्न साखळीवर परिणाम होतो. हा वाढता परिणाम जैविक संस्थेवर मोठे आघात करतात. त्यामुळे एखाद्या प्रदेशाचे  पर्यावरण संतुलित ठेवायचे असेल तर त्यासाठी अन्न साखळी व्यवस्थित चालली पाहिजे. गरजेपेक्षा जास्त  प्राणीहत्या हि पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरते. सम्राट अशोक यांनी सर्वप्रथम आपल्या राज्यात प्राणी हत्या कायदा पास करून घेतला आणि तो सर्व सामान्य माणसाला वाचता  आला पाहिजे म्हणून शिलालेखाच्या द्वारे आपल्या संपूर्ण राज्यात लिहून घेतला आहे. यातून सम्राट अशोक यांच्या काळात शिक्षणाचे महत्व किती होते याची  माहिती मिळते. सम्राट अशोक यांचे शिलालेख हेच सम्राट अशोक यांच्या साम्राज्याचे आणि तत्कातील लोकजीवनाचे ऐतिहासिक संदर्भ सांगणारे दाखले आहेत. भारताच्या भूमी मध्ये सम्राट अशोक यांच्या सारख्या सम्राटाची ओळख  विस्मरणात जाते हि गोष्ट पटणारी नाही. सम्राट अशोक यांचा या देशाला विसर पडला म्हणून देशाची सत्ता पारतंत्र्यात गेली हे देखील तितकेच सत्य आहे. सम्राट अशोक यांच्या बद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाले पाहिजेत. 
प्राणी हत्या विषयी आजवर कोणत्याच शासकाला कायदा करण्याचे सुचले नसावे, परन्तु सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ते करून दाखवले आहे. इतिहासात असा सम्राट होणे नाही. जगाच्या इतिहासात हि अश्या पद्धतीचा महामानव चक्रवर्ती सम्राट झालेला नाही. एवढे अवाढव्य साम्राज्य हाताळण्याचे कौशल्य यामुळेच सम्राट अशोक जगाच्या इतिहासात अजरामर झालेला आहे. 
सम्राट अशोक यांच्याविषयी प्रत्येक शिलालेखातून त्यांच्या  साम्राज्याविषयी त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेवू या. 
क्रमश…
 

ABCPR लेणी संवर्धक टीम

Leave a Reply